शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा -धैर्यशील माने यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:30 IST

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्दे कुरुंदवाड येथे उपोषण; प्रदूषण नियंत्रण मंडळावर टीकास्त्र

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगा गटारगंगा बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करीत नसून, तडजोडीचे काम करीत आहे. त्याचे पाप पंचगंगाकाठच्या नागरिकांना भोगावे लागत असून, नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी केले.

पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने येथील नगरपालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माने बोलत होते. प्रारंभ समितीचे पदाधिकारी व पंचगंगाकाठच्या नागरिकांनी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर नदीपात्रात उतरून जलपर्णी घेऊन व मानवी विळखा घालून नदी प्रदूषण करणाºया घटकांचा व प्रशासनाचा निषेध कला. त्यानंतर येथील पालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, रामभाऊ मोहिते, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, आप्पासोबंडगर, विलास कांबळे, सतीशभंडारे, आदींनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, साधना मंडळाचे जयपाल बलवान, दीपक पोमाजे, सुनील कुरुंदवाडे, कृष्णा लोकरे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, मधुकर सासणे, विश्वास बालिघाटे, किरण आलासे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.माणगाव बंद उद्यारुकडी माणगाव : पंचगंगा बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माणगाव (ता. हातकणंगले) येथे उद्या, रविवारी गावबंद व जागृती फेरीसह साखळी उपोषण करण्याचे येथील महादेव मंदिरात झालेला सर्वपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी रुकडी येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दि. १ जूनपासून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणाची दाहकता वाढत असून, हातकणगंले व शिरोळ तालुक्यांत या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये माणगाववाडीचे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती झाकीर भालदार यांनी दिली.पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने तेरवाड येथील पंचगंगा नदीला मानवी विळखा घालताना जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, विलास कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.